हळद हे एके मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलीत आहे. प्रतिवर्षी सुमारे २५ लाख टन मसाले पिकांचे उत्पादन भारतात होते , भारतातील अनेक राज्यप्रमाणेच महाराष्ट्रातही मासालेवर्गीय पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे.मसाले पिकांमध्ये प्रामुख्याने मिरची , आद्रक , हळ द, लसूण, इत्यादी पिके घेतली जातात . भारत हा जगातील हळद पिकविणारा एक प्रमुख देश आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६ % हळद भारतात होते. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा , सांगली , कोल्हापूर , अस्मानाबाद , लातूर नांदेड , परभणी , हिंगोली , चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात होते. येत्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात हळदी लागवडीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली आहे. हळदीची झाडे हि कर्दळीच्या , आल्याच्या झाडाप्रमाणेच असतात. या झाडाची पानेही आल्याच्या झाडासारखीच हिरवी व लांब असतात. त्यांना हळदीचा मंद सुवास असतो. भारतात प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. हळदीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामध्ये रोजच्या जेवणामध्ये तसेच डाळीच्या वरणार हळ...