Skip to main content

कृषी विभाग देणार काजू लागवडीला प्रोत्साहन

नागपूर - पारंपरिक पिकांना वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास आणि हमीभाव मिळत नसल्याची होणारी ओरड यावर पर्याय म्हणून आता नागपूर विभागात काजू लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. कृषी विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, लवकरच या संदर्भाने मोर्चेबांधणी होणार असल्याची माहिती खुद्द विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी दिली.

पूर्व विदर्भातील गडचिरोली, नागपूर जिल्ह्याच्या रामटेकसह धान उत्पादक गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील वातावरण काजू लागवडीला पोषक आहे. यापूर्वीदेखील या भागात शेतकऱ्यांद्वारे काजूचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतले जात होते; त्याच्या खुणाही गडचिरोली, रामटेक परिसरात पाहावयास मिळतात. रोजगार हमी योजनेतूनदेखील कृषी विभागाने या भागात काजू लागवडीचा प्रयोग केला होता. शेतकऱ्यांकडून त्या वेळी होणारी काजूची लागवड लक्षात घेता त्यांना रोपांचा पुरवठा करण्याकरिता गडचिरोली, रामटेक येथील कृषी विभागाच्या नर्सरीतून सोय होती. या दोन्ही रोपवाटिकांमध्ये मातृवृक्ष आजही आहेत.

काजू लागवड यशस्वी होत असल्याचे अनुभव लक्षात घेता या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यानुसार वर्धा वगळता नागपूर विभागातील, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत काजू लागवड केली जाणार आहे. त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांनादेखील त्या पुढील काळात प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

मंगळवारी कार्यशाळा
बाय.एफ. संस्थेच्या माध्यमातून नाबार्डच्या वाडी प्रकल्पात सुमारे 700 एकरांवर काजू लागवड रामटेक तालुक्‍यात करण्यात आली आहे. कोरडवाहू असलेल्या या पीकापासून लागवडीनंतर तीन वर्षांत उत्पादन सुरू होते. या पिकाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मंगळवारी (ता. 28) वनामती येथे कार्यशाळा होणार आहे. कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी याला हजर राहतील. दापोली कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ला येथील काजू तज्ज्ञांना बोलावण्यात येणार आहे. विदर्भात हे पीक ठिबकवर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.

"पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काजू घेतला जातो. जंगली जनावरांचा या पिकाला त्रास नसल्यामुळे या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याकरिता कृषी विभाग प्रयत्नरत आहे. '
- विजय घावटे
विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर 

Comments

Popular posts from this blog

डाळिंब -आंबे बहार व्यवस्थापन- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि श्री. राजू गाडेकर, संगमनेर

डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्‍याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्‍या मस्कत ,  गणेश व जी - १३७ ,  आरक्त्त ,  मृदुल ,  शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे ,  त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब   लागवडी खालील   क्षेत्र   खूप   वाढलेले आहे. डाळींबाच्या अनेक जाती असल्या तरी गणेश या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढोकला (गुजरात) ,  ज्योती (कर्नाटक) ,  जोधपूर रेड व जालोर सिडलेस (राजस्थान) या जातीही भारताच्या इतर भागात लावल्या जातात. डाळींब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळींब फळामध्ये ७८% पाणी ,  १.९ प्रथीने ,  १.७% स्निग्ध पदार्थ ,  १५% साखर व ०.७% खनिजे असतात. याशिवाय केल्शियम १० ,  फॉस्फरस ७० ,  लोह ०.३० ,  मॅग्नेशियम १२ ,  सोडियम ४ व पोटॅशियम १७ मि.ग्रॅ./१००ग्रॅम इतकी खनिजे असतात. तसेच थायमीन ०.०६ ,  रिबोफ्लेवीन ०.१ ,  नियासीन ०.३ व क जीवनसत्त्वे असतात. डाळिंब हे पूर्णतः सदा...

जीवामृत

जीवामृत:प्रमाण 1 एकर साठी:          200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे . दिवसातून दोनदा सकाळ व   संध्याकाळ काठीने ढवळावे . महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना  200 ते 400 ली . जीवामृत दयावे . ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे. फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :   पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड   व नंत...

दशपर्णी अर्क

200 लि . पाणी + 20 लि . देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. . ताजे देशी गार्इचे शेन          + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी      हे मिश्रन चांगले ढवळा , व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात     10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि . तंबाखू पावडर + 1 कि . तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात      2 कि . कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  + 2 कि . करंजी ची पाने +      2 कि . सीताफळाची पाने + 2 कि . धोतऱ्यायाची पाने + 2 कि . येरंडीची...