Skip to main content

घरचा चारा नसेल, तर..दूध व्यवसाय तोटय़ाचाच


देशातील दूध व्यवसायाची सद्य:स्थिती भयावह असून गाईंचा पोषणाचा खर्च आणि मिळणारे दुग्धोत्पादन यांचा मेळ घालणे कठीण होत आहे. त्यामुळेच दूध व्यवसाय तोटय़ात आहे.
एक गाय सरासरी १४ ते १६ लिटर दूध देणारी निवडली तर तिची किंमत ७० हजार रुपयांपर्यंत असते. लसूण घास १० किलो (५० रु.), ऊस १० किलो (५० रु.), कडबा कुट्टी ५ किलो, गव्हाचे भूस ५ किलो (१०० रु.), सरकी पेंड ६ किलो (१६० रु.), मिनरल मिश्रण १०० ग्रॅम (२० रु.), कास धुण्यासाठी हळद वाइनर औषध (१ रु.), दिवसाची एका माणसाची मजुरी (३५ रु.), आजारपण (२० रु.) असा एकूण ४३६ रुपये खर्च दिवसाला येतो. गाय सरासरी १५ लिटर दूध देते. एका लिटरला मिळणारा दर २६ रु. आहे. १५ लिटर दुधाची किंमत ३९० रुपये म्हणजेच शेतकऱ्याला आजही ४३६-३९०=४६ रुपये तोटा सहन करावा लागतो. घरचा चारा असेल तर १५४ रुपये शेतकऱ्याला मिळतात. एका वेतापासून ३०० दिवसांत सरासरी २५०० लिटर दूध मिळते. त्याद्वारे ६५ हजार रुपयांचे उत्पादन मिळते. गाईचे वासरू कालवड असेल तर वर्षांची किंमत १० हजार रुपये मिळते. वळू असेल तर तो दुसऱ्याच दिवशी कसायाला ५०० रुपयांत विकला जातो.
गायीमुळे वर्षभरात ३६५० किलो खत मिळते. सरासरी त्याची किंमत ३ हजार रुपये. म्हणजे एका वेतापासून ७८ हजार मिळतात. पण चारा विकतचा असेल तर २५ हजार ८०० रुपये तोटा होतो. यातून कालवड आणि खतांचे पैसे वजा जाता १२ हजार ८०० रुपये तोटा एका गाईमागे होतो. घरचा चारा असेल तरच दुग्धव्यवसायात काहीतरी लाभ मिळतो.
शेतकऱ्यास व्यापारी वा दुधउत्पादकाकडून गाईंची वंशावळ मिळत नाही. वंशावळ कार्यक्रमाचा दर्जाही खालावला आहे. देशातील पशुपालक, दुध काढणारे लोक प्रशिक्षित नाहीत. त्यामुळेच भारतातील दुग्धोत्पादनासमोर मोठे आव्हान आहे. परदेशात मागील १०० वर्षांत ठरावीक गाईंचा वंशावळ कार्यक्रम राबवून दूध उत्पादन वाढविले आहे. तेथील गाईच्या प्रत्येक वेतात सरासरी १० लिटर दूध आहे. चारही सडामधील दूध सारखे आहे. तेथे दुधातील स्निग्धांश पाहून दुधाला दर दिला जातो. दूध जमा केल्यानंतर लगेचच खाद्य, औषधे, बँक हप्ता यांचे पैसे कापून रोजच्या रोज खात्यावर पैसे जमा होतात.
स्वीडन, हॉलंड, इस्रायल यांसारख्या देशांत अत्याधुनिक मिल्किंग पार्लरमध्ये गाई केव्हाही जाऊन दूध देऊ शकते. त्यामुळे कासांचे आजार कमी होतात. पशुपालकाचा दर कमी असला तरी त्यास महागाई निर्देशांकानुसार मोठय़ा प्रमाणावर सबसिडी दिली जाते. वंशावळ कार्यक्रमही कालवड जन्माला येईल अशा प्रकारेच केला जातो.
परदेशात मांसासाठी पशुपालन वेगळे केले जाते. गाई, वराह, कोंबडय़ा, शेळी, मेंढी यांचे मांसासाठी उत्पादन घेतले जाते. भारतात दूध व्यवसायासाठी मिळणाऱ्या सोयीसुविधा तोटक्या आहेत. औषधे, पशुखाद्य यांचा दर्जा अतिशय खराब आहे. त्यामुळेच भारतात दुग्धव्यवसाय करणे म्हणजे एक आव्हानच आहे.

Comments

Popular posts from this blog

डाळिंब -आंबे बहार व्यवस्थापन- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि श्री. राजू गाडेकर, संगमनेर

डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्‍याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्‍या मस्कत ,  गणेश व जी - १३७ ,  आरक्त्त ,  मृदुल ,  शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे ,  त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब   लागवडी खालील   क्षेत्र   खूप   वाढलेले आहे. डाळींबाच्या अनेक जाती असल्या तरी गणेश या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढोकला (गुजरात) ,  ज्योती (कर्नाटक) ,  जोधपूर रेड व जालोर सिडलेस (राजस्थान) या जातीही भारताच्या इतर भागात लावल्या जातात. डाळींब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळींब फळामध्ये ७८% पाणी ,  १.९ प्रथीने ,  १.७% स्निग्ध पदार्थ ,  १५% साखर व ०.७% खनिजे असतात. याशिवाय केल्शियम १० ,  फॉस्फरस ७० ,  लोह ०.३० ,  मॅग्नेशियम १२ ,  सोडियम ४ व पोटॅशियम १७ मि.ग्रॅ./१००ग्रॅम इतकी खनिजे असतात. तसेच थायमीन ०.०६ ,  रिबोफ्लेवीन ०.१ ,  नियासीन ०.३ व क जीवनसत्त्वे असतात. डाळिंब हे पूर्णतः सदा...

जीवामृत

जीवामृत:प्रमाण 1 एकर साठी:          200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे . दिवसातून दोनदा सकाळ व   संध्याकाळ काठीने ढवळावे . महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना  200 ते 400 ली . जीवामृत दयावे . ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे. फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :   पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड   व नंत...

दशपर्णी अर्क

200 लि . पाणी + 20 लि . देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. . ताजे देशी गार्इचे शेन          + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी      हे मिश्रन चांगले ढवळा , व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात     10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि . तंबाखू पावडर + 1 कि . तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात      2 कि . कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  + 2 कि . करंजी ची पाने +      2 कि . सीताफळाची पाने + 2 कि . धोतऱ्यायाची पाने + 2 कि . येरंडीची...