Skip to main content

सेंद्रिय ‘दशपर्णी’ अर्कामुळे कांदा उत्पादन खर्चात हजारो रुपयांची बचत

 
चांदवडच्या शेतकऱ्यांस टंचाईतही शेती फायदेशीर
फळे आणि पिकांवरील रासायनिक खते आणि कीड नाशकांचा अतिरेकी वापर नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असताना या रासायनिकीकरणास पर्याय म्हणून सदैव टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवडसारख्या तालुक्यातील वाहेगाव साळ येथील प्रयोगशील शेतकरी निवृत्ती न्याहरकर यांनी सेंद्रिय ‘दशपर्णी अर्क’चा पर्याय पुढे आणला आहे. कोणतीही रासायनिक खते व औषधांचा वापर न करता निव्वळ सेंद्रिय पद्धतीने त्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले असून उत्पादन खर्चात १० ते १२ हजार रुपयांची बचत त्यामुळे झाली आहे.
रासायनिक शेतीतून घेण्यात येणारी पिके आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्याने सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या फळांकडे तसेच पिकांकडे शेतकरी वळू लागले आहेत. न्याहरकर यांनी संपूर्ण कांदा पिकासाठी सेंद्रिय पद्धत व औषधांचा वापर केला आहे. त्यासाठी त्यांना एकरी केवळ ५५० रुपयांपर्यंत खर्च आला असून उत्पादन खर्चात घट झाल्याने सेंद्रिय शेती फायद्याची ठरत असल्याचे मत न्याहरकर यांनी व्यक्त केले आहे. न्याहरकर यांनी कांदा शेतीसाठी दशपर्णी अर्कचा वापर केला. त्यानुसार एक एकरसाठी आठ ट्रॉली शेणखत, दोन क्विंटल गांडूळ खत टाकून वाफे तयार केले. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ात कांद्याची लागवड केली. त्यानंतर २०० लिटर पाण्यात गायीचे १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, दोन किलो गूळ, दोन किलो द्विदल धान्याचे पीठ, वड आणि पिंपळाच्या वृक्षाखालील अर्धा किलो माती मिश्रण असे सर्व काही देण्यात आले. सेंद्रिय पद्धतीच्या या खतामुळे कांद्याला पोषण मूल्ये मिळाल्याने त्याच्या आकारातही वाढ झाली. तसेच अडीच लिटर गांडूळ पाणी १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये १०० ग्रॅम गूळ टाकून तयार झालेले मिश्रण १०० लिटर पाण्यात टाकून फवारणी केली. यामुळे रोगांना अटकाव होऊन कांद्याच्या दर्जात वाढ झाली.
सीताफळ, कडुनिंब, पपई, निरगुडी, दोन किलो एरंडाचा पाला, दोन किलो देशी गायीचे शेण, पाच लिटर गोमूत्राचे मिश्रण २०० लिटर पाण्यात ३० दिवस सावलीत आंबविल्याने उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार झाल्याचे न्याहरकर यांनी नमूद केले. सुरुवातीला हा प्रयोग यशस्वी होईल की नाही याबद्दल न्याहरकर यांना साशंकता होती; परंतु पाण्याची कमतरता असतानाही या अनोख्या पद्धतीमुळे कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले. सेंद्रिय शेतीच्या या प्रयोगाचा इतर शेतकऱ्यांनाही लाभ व्हावा म्हणून ते आता मार्गदर्शन करत आहेत. पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या ठिकाणीही अशा प्रकारे सेंद्रिय शेती केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, हे न्याहरकर यांनी सिद्ध केले आहे.

Comments

Popular posts from this blog

डाळिंब -आंबे बहार व्यवस्थापन- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि श्री. राजू गाडेकर, संगमनेर

डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्‍याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्‍या मस्कत ,  गणेश व जी - १३७ ,  आरक्त्त ,  मृदुल ,  शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे ,  त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब   लागवडी खालील   क्षेत्र   खूप   वाढलेले आहे. डाळींबाच्या अनेक जाती असल्या तरी गणेश या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढोकला (गुजरात) ,  ज्योती (कर्नाटक) ,  जोधपूर रेड व जालोर सिडलेस (राजस्थान) या जातीही भारताच्या इतर भागात लावल्या जातात. डाळींब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळींब फळामध्ये ७८% पाणी ,  १.९ प्रथीने ,  १.७% स्निग्ध पदार्थ ,  १५% साखर व ०.७% खनिजे असतात. याशिवाय केल्शियम १० ,  फॉस्फरस ७० ,  लोह ०.३० ,  मॅग्नेशियम १२ ,  सोडियम ४ व पोटॅशियम १७ मि.ग्रॅ./१००ग्रॅम इतकी खनिजे असतात. तसेच थायमीन ०.०६ ,  रिबोफ्लेवीन ०.१ ,  नियासीन ०.३ व क जीवनसत्त्वे असतात. डाळिंब हे पूर्णतः सदा...

जीवामृत

जीवामृत:प्रमाण 1 एकर साठी:          200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे . दिवसातून दोनदा सकाळ व   संध्याकाळ काठीने ढवळावे . महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना  200 ते 400 ली . जीवामृत दयावे . ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे. फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :   पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड   व नंत...

दशपर्णी अर्क

200 लि . पाणी + 20 लि . देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. . ताजे देशी गार्इचे शेन          + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी      हे मिश्रन चांगले ढवळा , व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात     10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि . तंबाखू पावडर + 1 कि . तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात      2 कि . कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  + 2 कि . करंजी ची पाने +      2 कि . सीताफळाची पाने + 2 कि . धोतऱ्यायाची पाने + 2 कि . येरंडीची...