Skip to main content

झिरो बजेट नैसर्गिक शेती कशी करायची जाणून घ्या इथे…..

(प्रतिनिधी):- नागपूर नॅचरल आणि झिरो बजेट आध्यात्मिक नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीच्या वतीने ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवार ३ मेपासून करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पाळेकर यांनी बोलतांना सांगितले की, “रासायनिक शेती, सेंद्रीय शेती ही शेतकऱ्यांना कर्जात बुडवणारी आहे. त्याप्रमाणे शेतीसाठी वापरण्यात येणारे ठिबक सिंचन हे सुद्धा धोकादायकच आहे. ठिबक सिंचनात पाणी सरळ झाडांना जातो त्यामुळे झाडांचे नुकसान होते. यापेक्षा तुषार सिंचन हे लाभदायक आहे. जे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करतात त्यांनी तो तातडीने थांबवावा.” असे ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध तंत्रांबद्दल सांगितले. नैसर्गिक शेतीत आच्छादन आणि वाफसा हे महत्त्वाचे घटक आहे, यामुळे ९० टक्के पाण्याची बचत होते. पिकांना, झाडांना आच्छादन हे अत्यंत आवश्यक आहे. मुळांना पाण्याची आवश्यकता नसते. ५० टक्के वाफ आणि ५० टक्के हवा ही मुळांसाठी आवश्यक असते. पाणी जास्त दिले तर पिके पिवळी पडतात. दुपारी १२ वाजता झाडांची जी सावली पडते त्या सावलीच्या बाहेर ६ इंचावर पाणी दिल्यास वाफ तयार होते. ती वाफ मुळे शोषून घेतात. वाफ आणि हवेच्या मिश्रणामुळे झाडांची वाढ अत्यंत चांगली होते. कीड व्यवस्थापनाबद्दल सांगताना त्यांनी नीमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, शतपर्णी याबद्दल सांगतानाच विविध प्रकारचे बुरशीनाशक आणि टॉनिकची माहिती दिली. सप्त धानांकुर अर्क हा किडीसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगत ते कसे तयार करतात, याबाबत सांगितले. जमिनीची पोत कशी सुधारता येईल, देशी गाईचे महत्त्व काय, शेण आणि गोमुत्र याचे महत्त्व, त्यापासून तयार कोणारे जीवामृत, जीवामृताला वापरण्याच्या पद्धती आदींबाबत विस्तृत माहिती दिली.
रासायनिक आणि सेंद्रीय शेतीमध्ये १० टक्के पाण्याची बचत होते. पाणी पिकांसाठी खूप आवश्यक आहे. पिकांना भरपूर पाणी द्या, असे कृषी विद्यापीठ सांगत असतात. मात्र, त्यांचे हे शिक्षण धांदात खोटे आहे. झाडांना पाण्याची जास्त आवश्यकताच नाही. नैसर्गिक शेतीमध्ये ९० टक्के पाण्याची बचत होते, असा दावा श्री. सुभाष पाळेकर यांनी केला. या शिबिरामध्ये राज्यभरातून आलेले सुमारे एक हजार शेतकरी उपस्थित होते. सत्रादरम्यान श्री. सुभाष पाळेकर हे शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव विचारत होते. शेतकरीही त्यांनी त्यांच्या शेतात केलेले विविध प्रयोग मंचावर येऊन सांगत होते.

Comments

Popular posts from this blog

डाळिंब -आंबे बहार व्यवस्थापन- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि श्री. राजू गाडेकर, संगमनेर

डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्‍याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्‍या मस्कत ,  गणेश व जी - १३७ ,  आरक्त्त ,  मृदुल ,  शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे ,  त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब   लागवडी खालील   क्षेत्र   खूप   वाढलेले आहे. डाळींबाच्या अनेक जाती असल्या तरी गणेश या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढोकला (गुजरात) ,  ज्योती (कर्नाटक) ,  जोधपूर रेड व जालोर सिडलेस (राजस्थान) या जातीही भारताच्या इतर भागात लावल्या जातात. डाळींब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळींब फळामध्ये ७८% पाणी ,  १.९ प्रथीने ,  १.७% स्निग्ध पदार्थ ,  १५% साखर व ०.७% खनिजे असतात. याशिवाय केल्शियम १० ,  फॉस्फरस ७० ,  लोह ०.३० ,  मॅग्नेशियम १२ ,  सोडियम ४ व पोटॅशियम १७ मि.ग्रॅ./१००ग्रॅम इतकी खनिजे असतात. तसेच थायमीन ०.०६ ,  रिबोफ्लेवीन ०.१ ,  नियासीन ०.३ व क जीवनसत्त्वे असतात. डाळिंब हे पूर्णतः सदा...

जीवामृत

जीवामृत:प्रमाण 1 एकर साठी:          200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे . दिवसातून दोनदा सकाळ व   संध्याकाळ काठीने ढवळावे . महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना  200 ते 400 ली . जीवामृत दयावे . ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे. फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :   पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड   व नंत...

दशपर्णी अर्क

200 लि . पाणी + 20 लि . देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. . ताजे देशी गार्इचे शेन          + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी      हे मिश्रन चांगले ढवळा , व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात     10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि . तंबाखू पावडर + 1 कि . तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात      2 कि . कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  + 2 कि . करंजी ची पाने +      2 कि . सीताफळाची पाने + 2 कि . धोतऱ्यायाची पाने + 2 कि . येरंडीची...