Skip to main content

Posts

प्रत्येक तालुक्‍यात महिन्याला झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे शिबिर

  कोल्हापूर - जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात महिन्यातून एकदा झिरो बजेट नैसर्गिक शेती शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही या शिबिराचे आयोजक सुधाकर पाटील यांनी दिली. तथाकथित आधुनिक शेतीचे गंभीर दुष्परिणाम आज आपल्याला भेडसावत आहेत. शेती करण्याचा खर्च दिवसागणिक वाढत आहे. त्या प्रमाणात उत्पादन घटत चालले आहे. याला एकच पर्याय म्हणजे सुभाष पाळेकर यांची शून्य खर्चाची नैसर्गिक शेती हा आहे. या शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन स्वतः श्री. पाळेकर देशात तसेच परदेशात शिबिरांच्या माध्यमातून करत आहेत. देशातील तसेच परदेशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान कसे पोचवता येईल, या विचारातून कोल्हापुरात 24 ते 26 फेब्रुवारीअखेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्‌घाटन उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आध्यात्मिक मार्गदर्शक संजीव कुलकर्णी, तानाज...

शेळीपालनाचे अर्थशास्त्र

जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे. देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते. शेळयांच्या जाती दूध उत्पादन देणाऱ्या शेळींच्या जाती – जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी. लोकरी उत्पादन देणाऱ्या शेळींच्या जाती – बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी. विदेषी जातीच्या शेळया उदा. सानेन ,टोने,बर्ग,अल्पाईन,एम्लोन्यूबियन,अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते. आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते. मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जाती उस्मानाबादी- अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी] संगमनेरी – अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उप...

घरचा चारा नसेल, तर..दूध व्यवसाय तोटय़ाचाच

देशातील दूध व्यवसायाची सद्य:स्थिती भयावह असून गाईंचा पोषणाचा खर्च आणि मिळणारे दुग्धोत्पादन यांचा मेळ घालणे कठीण होत आहे. त्यामुळेच दूध व्यवसाय तोटय़ात आहे. एक गाय सरासरी १४ ते १६ लिटर दूध देणारी निवडली तर तिची किंमत ७० हजार रुपयांपर्यंत असते. लसूण घास १० किलो (५० रु.), ऊस १० किलो (५० रु.), कडबा कुट्टी ५ किलो, गव्हाचे भूस ५ किलो (१०० रु.), सरकी पेंड ६ किलो (१६० रु.), मिनरल मिश्रण १०० ग्रॅम (२० रु.), कास धुण्यासाठी हळद वाइनर औषध (१ रु.), दिवसाची एका माणसाची मजुरी (३५ रु.), आजारपण (२० रु.) असा एकूण ४३६ रुपये खर्च दिवसाला येतो. गाय सरासरी १५ लिटर दूध देते. एका लिटरला मिळणारा दर २६ रु. आहे. १५ लिटर दुधाची किंमत ३९० रुपये म्हणजेच शेतकऱ्याला आजही ४३६-३९०=४६ रुपये तोटा सहन करावा लागतो. घरचा चारा असेल तर १५४ रुपये शेतकऱ्याला मिळतात. एका वेतापासून ३०० दिवसांत सरासरी २५०० लिटर दूध मिळते. त्याद्वारे ६५ हजार रुपयांचे उत्पादन मिळते. गाईचे वासरू कालवड असेल तर वर्षांची किंमत १० हजार रुपये मिळते. वळू असेल तर तो दुसऱ्याच दिवशी कसायाला ५०० रुपयांत विकला जातो. गायीमुळे वर्षभरात ३६५० किलो...

‘झिरो बजेट’ शेतीचा संकल्प

जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांच्यात कोणत्याही अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत नाहीत. मात्र जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो, तेव्हा अनेक प्रकारच्या कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे का व्हावे? याचा विचार आपण सातत्याने करीत होतो. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी मानवाने शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले. माती आणि इतर सर्व संसाधनांकडून अधिक ओरबाडून घेण्याचे प्रमाण वाढले. गरजा अधिक म्हणून अधिक उत्पन्नाची गरज, पण यातून जे साध्य करायचे ते झालेच नाही. निसर्गाचे मात्र शोषण झाले, असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे. मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे ‘झिरो बजेट’, अशी सुभाष पाळेकर यांची सहज-सोपी संकल्पना आहे. आधुनिक पद्धतीने रासायनिक शेतीतून उत्पन्न वाढवायचे की, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारायचा, अशा संभ्रमावस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर ‘झिरो बजेट’ नैसर्गि...

शेतीतच करणार करिअर

नारळ बागेत अंतरपिकांचे नियोजन

बेंदुर विशेष - बैलांची घ्या योग्य काळजी